पळून जाणं म्हणजे स्वातंत्र्य नाही, ती एक नव्या कैदेत उडी असते…
घरातून पळून जाणं — ही गोष्ट आजच्या काळात अजिबात नवीन राहिली नाही.
Instagram, Facebook, Reels, Chatrooms — या जगात प्रेम अतिशय लवकर होतं आणि त्याहूनही लवकर "लग्न करून पळून जाणं" हा विचार डोक्यात येतो.
पण गंमत अशी की, या निर्णयाचं वास्तव 'लव्ह स्टोरी'मध्ये नाही, तर आयुष्याच्या चक्रव्यूहात दिसतं.
"तो खरंच तुझ्यासोबत आहे का?"
तू ज्याच्यासोबत पळून जातेस, त्याचं तुला खरंच किती माहीत आहे?
तो केवळ सगळ्यांपासून लपून लग्न करतोय का?
तो तुझं मत, स्वप्न, भविष्यातलं शिक्षण, करिअर समजून घेतोय का?
त्याचं आयुष्य स्थिर आहे का? तो जबाबदार आहे का?
तुला वाटतं की "तो फक्त माझ्यासाठी काहीही करेल", पण अनेक वेळा हे प्रेम फक्त परिस्थितीचा फुगा असतो — जो वेळ आली की फुटतोच.
पळून जाण्याऐवजी उभं राहा
पळून जाणं ही कधीच ताकद नसते, ती एक भीतीपोटी घेतलेली चुकीची कृती असते.
जर तुमचं प्रेम खरंच खरं असेल, तर ते पालकांसमोर मांडता येईल, वेळ घेतली जाईल, पण त्याला आधार मिळेल.
पळून गेल्यावर जग जे विचारतं त्याचा राग येतो का?
"कुणा बरोबर पळालीस?"
"काही विचार केला का?"
"काय मिळालं यातून?"
पण या प्रश्नांना उत्तरं कधी स्वतःलाच सापडत नाहीत.
प्रेम काय फक्त सीन असतो का?
आपण रोज reels बघतो —
बाईकवरून पळून जाताना नायिका, बाजूला पाठमोरा नायक, त्याचं हातात हात, आणि भक्कम music…
पण वास्तवात हे असं नसतं. वास्तवात,
पळून गेल्यावर घराचं दरवाजं कायमचं बंद होतं.
जेवायला अन्न नाही, पाठीवर ओझं आणि वयानुसार नात्यांचं कलंक लागतो.
समाजात सन्मान नाही, विश्वास उरत नाही.
आईवडिलांचं निस्सीम प्रेम विसरू नका
तुमच्यासाठी आयुष्य झिजवणारे आई-वडील ही तुमची खरी शक्ती असतात.
तुम्ही पळून जाता तेव्हा त्यांचं काय होतं हे फक्त एक रात्र रडलेली आईच सांगू शकते.
"आईवडिलांनी नकार दिला म्हणून पळून गेलेली मुलगी, आणि त्या निर्णयाने स्वतःचं भविष्य उध्वस्त करणारी स्त्री — यात खूप फरक नसतो."
नाही म्हणणं म्हणजे तिरस्कार नव्हे
जर तुमच्या पालकांनी 'नाही' म्हटलं असेल, तर त्यात तिरस्कार नाही, अनुभव आहे.
कधी वाटतं की ते जुन्या विचारांचे आहेत — पण त्यांनीच संसार, जबाबदाऱ्या, लोकांचा चेहरा, प्रेमाची गोडी आणि फसवणुकीचा कडूपणा अनुभवलाय.
तुमचं प्रेम, तुमची मर्जी सगळं ठिक आहे, पण ते सगळं "दृष्टी"ने बघा, "भावना"ने नव्हे".
एक क्षण — दोन्ही आयुष्यभर लक्षात राहणारे
ज्याच्यासोबत पळून जाताय तो कायम हात धरणार आहे की फक्त क्षणभंगुर साथ देणार आहे — हाच फरक समजून घ्या.
एक प्रेमळ हात जर तुम्हाला आयुष्यभर जपणार असेल, तर तो घरच्यांच्या आशिर्वादाने मिळालेला असतो — लपून नव्हे, उघडपणे.
#पळूनजाणंनाहीउत्तरनाही
#प्रेमकिभावना
#मनाचाभाव
#समजूतदारनिर्णय
#आईवडिलांचाप्रेम
#समाजआरसा
#वास्तवदर्शीलेख
#मराठीमन #RealMarathiThoughts
#EmotionalTruths #LifeChoices #YoungLove #पळूनगेलीस #मनाचा_आरसा
Comments
Post a Comment