अनुभवातून समजतं…
आयुष्य माणसाला खूप काही शिकवतं. काही गोष्टी पुस्तकातून समजतात… काही लोकांच्या बोलण्यातून… पण काही सत्यं अशी असतात जी फक्त जखमा झाल्यावरच समजतात. राख होणं आणि कोळसा होणं यात खूप फरक असतो. राख जळून संपलेली असते… पण ती पुन्हा कुणाला जाळत नाही. कोळसा मात्र स्वतःही काळा होतो आणि दुसऱ्यालाही काळं करतो. म्हणूनच काही लोक आयुष्यातून गेल्यावर माणूस तुटतो, जळतो, संपतो… पण तरीही आतून एक गोष्ट ठरवतो “पुन्हा तसंच व्हायचं नाही.” कारण खोट्या आपुलकीपेक्षा एकटेपण परवडतं. आजकाल नात्यांमध्ये प्रेम कमी आणि उपयोग जास्त दिसतो. लोक जवळ येतात… पण कायमचे राहण्यासाठी नाही, तर स्वतःचा रिकामेपणा भरून काढण्यासाठी. काम असेपर्यंत फोन येतात. गरज असेपर्यंत काळजी घेतली जाते. आणि उपयोग संपला की माणूसही संपतो. सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा आपण ज्यांना “आपलं” समजत असतो, त्यांच्यासाठी आपण फक्त “वेळ जाण्यासाठीचं माणूस” असतो. मग हळूहळू माणूस बदलायला लागतो. पूर्वीसारखा प्रत्येकावर विश्वास ठेवत नाही. सगळ्यांसाठी धावत नाही. प्रत्येकाला मनात जागा देत नाही. लोक म्हणतात “तू खूप बदललास…” पण खरं म्हणजे...