नातं आपलं… पण बदनामी त्यांची निर्णयांच्या गोंधळात आई-वडीलच जळतात

एक वास्तव, ज्यावर आपण कधी विचारच करत नाही.
आज मनातल्या मनात उलथापालथ सुरू होती, म्हणून हा लेख तुमच्यासमोर ठेवतोय.
बोलायला कठीण विषय आहे… पण सांगायलाच हवा.
कारण समाजात आज जे सुरू आहे, ते पाहून असं वाटतं
आपलं पिढ्यानपिढ्याचं शहाणपण कुठेतरी हरवत चाललंय.

आजकाल मुलं चुकतात… आणि लोक म्हणतात, “संस्कारच नाहीत घरचे.”

खरंच असं आहे का?

आई-वडील एवढे वाईट नसतात रे…
जे आपल्याला चालायला शिकवतात, बोलायला शिकवतात,
रात्र रात्र जागून आपल्यावर ओंजळभर प्रेम वर्षवतात…
त्यांनीच काय वाईट संस्कार दिले असतील?

चुका आपल्या…
पण बोट मात्र थेट त्यांच्या तोंडावर.

“तुमच्या मुलीला असं कसं होऊ दिलंत?”
“तुमच्या मुलाला कंट्रोल नाही का?”
“संस्कार नाहीत म्हणून पळून जातात!”

अरे…
त्यांना कोणी विचारत नाही का
आई-वडिलांची काय चूक होती?
त्यांनी इतकं प्रेम दिलं, त्यात कसली कमतरता होती?

आणि सगळ्यात अधिक जखमी कोण होतं माहिती आहे?

तो बाप… आणि ती आई.

बायको-बाळ, घर-संसार, जबाबदाऱ्या या सगळ्यात अडकलेले असतात आई-वडील.
त्यांचा जग अगदी छोटा
मुलांचं भविष्य, त्यांचं सुख, त्यांचं शिक्षण, त्यांची वाटचाल.

आणि अचानक एक दिवस…
मुलगा-मुलगी कोणत्याही विचाराशिवाय घर सोडून देतात.
तेव्हा घरातली शांतता ही शांतता नसते
ती किंकाळी असते, जी भिंतीही ऐकतात.

आई विचारते,
“माझं प्रेम कमी पडलं का?”
बाप विचारतो,
“मी कुठे कमी ठरलो?”

लोक मात्र म्हणतात
“संस्कार बघा संस्कार!”

प्रेम करणे चूक नाही…

पण प्रेमाच्या नावाखाली घराला नरकात ढकलणे मात्र नक्कीच चूक आहे.

आजकाल प्रेम लवकर होतं…
जपायला मात्र कुणालाच वेळ नसतो.
वरदानासारखी एक भावना आज
फॅशन बनलीये.

दोन दिवस चॅट…
चार दिवस कॉल…
एक महिना भेट…
आणि मग थेट घरच्यांविरोधात निर्णय!

ही परिपक्वता आहे का प्रेमातली?
की अपरिपक्व मेंदूने स्वतःलाच दिलेला धोका?

लग्न हा खेळ नाही…
दोन दिवसाचा उत्साह नाही…
तो आयुष्यभराच्या जबाबदाऱ्यांचा प्रवास आहे.

आई-वडील त्यातले प्रत्येक वळण पार केलेले असतात.
आणि आपल्या निर्णयाचं चुक-माक बघण्याइतकी त्यांच्याकडे
जीवनाची नजर आणि अनुभव असतो

“स्वतःच्या मनानं निर्णय घेणार!”

अरे, पण त्यात घर मोडणार असेल तर?

तुमच्या एका चुकीने आईच्या डोळ्यांत पाणी येत असेल,
बाप रात्रीभर जागत असेल,
त्यांना लोकांकडून सुनावणी मिळत असेल…

तर ते प्रेम कोणाला दाखवण्यासाठी?
समोरच्या व्यक्तीसाठी?
की स्वतःच्या समाधानासाठी?

मुलं म्हणतात
“मला माझं आयुष्य जगू द्या.”

पण मित्रांनो,
त्यांचेही तर एक आयुष्य आहे ना!
त्यांच्या हृदयाला ओरखडा घालण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?

आई-वडीलांची एकच इच्छा असते

“आपलं लेकरू सुखी राहो.”

त्यांना दागिने नको…
घर नको…
संपत्ती नको…
फक्त एवढंच हवं
त्यांचं मूल हसत जगावं.

मग त्यांच्या डोळ्यांत पाणी आणून
आपण कोणतं सुख मिळवतो?

जर प्रेम खरं असेल…

तर त्यांना सांगायला काय अडचण आहे?

प्रेमात धैर्य असतं,
पळून जाण्यात नाही.

समोरचा मुलगा/मुलगी खरंच योग्य असेल
तर घरच्यांना तेही दिसतं.
आई-वडील हट्टी नसतात…
ते फक्त जखमी होऊ इच्छित नाहीत.

त्यांनी तुमच्यासाठी आयुष्यभर झिजलं,
आणि तुम्ही दोन दिवसाच्या प्रेमासाठी
त्यांना सोडून जाणार?

हीच का परतफेड?

नाती जपायला धैर्य लागतं…

आणि पळून जाण्यासाठी फक्त एक आवेश पुरतो.

आयुष्यभराचं नातं एका उतावीळ क्षणावर ठेऊ नका.
प्रेम असेल
काही बिघडत नाही,
थोडा वेळ द्या,
आई-वडीलांसोबत बसा,
त्यांच्या डोळ्यांत पाहा,
त्यांच्या भीती समजून घ्या.

तुमचा निर्णय त्यांना पटेल…
पण तुमची जबाबदारीही त्यांना दिसली पाहिजे.

शेवटी… निर्णय तुमचेच.

पण त्याचे परिणाम त्यांच्या आयुष्यभरावर.

म्हणूनच सांगतो
आधी विचार… मग निर्णय…
कारण तुमच्या ‘एक निर्णयाने’
त्यांच्या आयुष्याचा हवामान बदलतो.

आई-वडीलांना कधीही तुटू देऊ नका…
एका दिवसात मिळालेले प्रेम
त्या आयुष्यभर दिलेल्या प्रेमापेक्षा मोठं नाही.

जर या लेखातलं एक वाक्य तरी मनाला लागलं असेल,

तर घरच्या लोकांना घट्ट मिठी मारा.
त्यांना फक्त तेवढंच हवं असतं.

Comments